ठाणे:गोविंदा पथकांचा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल यंदा वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या "संस्कृतीची दहीहंडी २०२४" या महोत्सवात पाहायला मिळाला. यंदा ९ थर लावत आर्यन्स गोविंदा पथकाने ११ लाखाचे बक्षीस व ट्रॉफी पटकावली. या उत्सवास मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता मंगेश देसाई, अभिनेता क्षितिज दाते, शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तक नगर येथे संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या दहीहंडी उत्सवात पहिले ९ थर लावणाऱ्या गेविंदा पथकास ११ लाख रुपये व ट्रॉफी, पुढील ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख व आकर्षक ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीसांची लयलूट करण्यात आली. तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष सन्मान देण्यात आला.
दहीहंडी उत्सव मुंबई, ठाणेपुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहचला. प्रो कब्बड्डी प्रमाणे प्रो गोविंदा सुद्धा झालेला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळात लक्ष घातले आणि या खेळाची व्यापकता वाढली आणि या खेळाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला, असे कौतुकोद्गार मा. मुख्यमंत्री महोदयांनी काढले. गोविंदा खेळाच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिली.
दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून एकतेचा विचार घेऊन समाजात ऐक्याचे बीज रोवूया असे आवाहन मा. देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रो गोविंदाने दहीहंडी सणाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. या माध्यमातून हा खेळ सर्वदूर पोहचत आहे,असे कौतुकही त्यांनी केले.
देशासह राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांवर अत्याचार करून त्यांची निघृण हत्या केली जाते. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करावे तसेच दोषींना फाशी देण्यात यावी असा संदेश देणारे पथनाट्य संस्कृती दहीहंडी महोत्सवात ओम साईनाथ नवभारत मंडळाने सादर केले.
महिलांवर अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी २०१९ च्या नागपूर अधिवेशनात शक्ती कायद्याचे विधेयक मांडले होते. या कायद्यात दोषींना फाशीची शिक्षा अंतर्भूत आहे. या शक्ती कायद्याला राष्ट्रपती महोदयांनी मंजूरी देऊन या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. मुख्यमंत्री महोदयांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. या खेळाला प्रोत्साहन देत गोविंदांच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात, याबद्दल प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी दहीहंडी उत्सवावरील निर्बंध काढून या उत्सवाला प्रोत्साहन दिले. ७५ हजार गोविंदांचा विमा राज्य सरकारद्वारे उतरवण्यात आला. तसेच गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी त्यांनी जाहीर केली. दहीहंडी उत्सवाच्या पाठीशी मुख्यमंत्री महोदय भक्कमपणे पाठीशी उभे राहत आहे, याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आभार युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मानले. तसेच सर्वच गोविंदा पथकांनी उत्कृष्ट मानवी मनोरे या महोत्सवात सादर करून महोत्सवाची रंगत वाढवली याबद्दल सर्व गोविंदा पथकांचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले.
भर पावसात जय जवान गोविंदा पथकाने १० थर लावण्याचा प्रयत्न केला पण तो थोडक्यात हुकला. पण त्यांच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम. गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य अतिशय जल्लोषात व उत्साहात यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक तसेच संपूर्ण सरनाईक परिवारासह पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाण्यात दहीहंडी दरम्यान महिला अत्याचाराबाबत पथनाट्य व पोस्टरद्वारे केली जनजागृती
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
एमआयडीसी निवासी भागात पाणी टंचाई, टँकरची मागणी वाढली !
डोंबिवली:एमआयडीसी निवासी भागातील काही ठराविक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना...
स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : खा. नरेश म्हस्के
ठाणे : प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर द...
घोडबंदर कचरा हस्तांतरण केंद्रास नागरिकांचा विरोध, महापालिका पथकास अडचणी
ठाणे: ठाण्यात कचऱ्याच्या व्यवस...
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना परत मिळाले हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी, दागिने
ठाणे, २३ मार्च २०२५ – ठाणे जि...
Previous
Article