मीरा भाईंदर मधील मेट्रो या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत धावणार असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्वासन दिले आणि  मीरा-भाईंदर शहरातील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मेट्रो मार्गालगत तीन उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील एक पूल गेल्या वर्षीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. उर्वरित दोन पुलांपैकी दुसरा पूल येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत आणि तिसरा पूल ऑगस्टच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.