वसई : दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात, गोविंदा पथकांचा जोरदार सराव सुरू

वसई : दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात, गोविंदा पथकांचा जोरदार सराव सुरू

वसई : आगामी दहीहंडी उत्सव अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वसई-विरार परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, "बो बजरंगबली की जय!" च्या जयघोषात गोविंदा पथकांचा जोरदार सराव सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विविध गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेतली जात आहे. थर रचताना साजेसा ताळमेळ, वेळेचं नियोजन आणि शरीरसामर्थ्य यावर भर दिला जात आहे.

गोविंदा पथकांचे प्रशिक्षक सांगतात की, “दहीहंडी हा केवळ उत्सव नाही, तर सांघिक एकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक गोविंदाचा फिटनेस, प्रशिक्षण, आणि सुरक्षितता यावर आम्ही भर देतो.”

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. काही ठिकाणी लहान मुलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे देखील घेतली जात आहेत.

यावर्षी दहीहंडी स्पर्धा अधिक भव्य होण्याची शक्यता असून, आयोजक आणि गोविंदा पथकांकडून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने डॉक्टरांची टिम, आपत्कालीन यंत्रणा आणि अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध ठेवण्याचं नियोजन सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow