वसई:आदिवासी समाजाचे अस्तित्व वसई तालुक्यात टिकविण्यासाठी तसेच, सदर समाजाला उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी व शासकीय अनास्थेमुळे सुविधा न मिळणे यामुळे आदिवासीना कुचंबणा सहन करावी लागत आहे. या विरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती वसई कार्यालयासमोर तर, आदिवासी एकता परिषदे मार्फत वसई तहसीलदार कार्यालयासमोर, भारताचा कम्युनिस्ट पक्ष क्मार्क्सवादी) लाल बावटा यांचे उपविभागीय कार्यालय, वसई समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. समजी संघटनेने विविध जिल्ह्यात ठिकाणी २१ ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केली होती. वसईतील संघटनेचे आंदोलन हे बेमुदत स्वरूपाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जल जीवन योजनेअंतर्गत पिण्याचे पाणी, वन हक्काची मान्यता, बालकांना मोफत शिक्षण कायदा, वेट बिगारांना पुनर्वसन करणे, इत्यादी विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते आदिवासी एकता परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजनाची अंमलबजावणी करण्यात यावी, जे पाडे डोंगराच्या पायथ्याशी आहेत, ज्या पाड्यात सतत पावसाचे पाणी साचते त्या पाड्यांसाठी अत्यंत तातडीची जागा बदली व पुनर्वसन योजना करणे, झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत पाड्यांचे अस्तित्व संपवून इमारतीमधे घरे (म्हाडा) देण्यात येत आहेत, वसई तालुक्यातील सर्व तलावांचे सुशोभिकरणकरून आदिवासीचे अस्तित्व संपवले जात आहे, बुलेट ट्रेनसाठी जागा, मेट्रो ट्रेनसाठी जागा भूसंपादन करून आदिवासी हद्दपार होत आहे, वसई तालुक्यातील सर्व रस्त्याचे रूंदीकरण करून रस्त्यात येणाऱ्या घरांचे दूसरीकडे विस्थापन केलं जात आहे या विरोधात धरणे आंदोलन आयोजित केलं होतं., सागरी महामार्गासाठी जागा (कोस्टल उपलब्ध करून दिली जात आहे, वसई तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी दिली जाणारी जागा, वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी जाणारी जागा, वसई तालुक्यात फिरणाऱ्या रिंगरूट व रेल्वेसाठी जागा, आदिवासी वस्ती सुधार योजना, आदिवासी पाड्यांच्या जागेवर विविध प्रकारचे आरक्षण टाकून आदिवासी पाड्यांचे अस्तित्व संपवणे, अशा प्रकारच्या विविध योजना राबवून वसई तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली आदिवासी समाज संपवला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर ठिय्या आंदोलनातील प्रमुख मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या. वसई तालुक्यातील पारंपारीक आदिवासी पाड्यांची नोंद त्वरित त्या पाड्याच्या सात बारा उताऱ्यावर करणे, वसई तालुक्यातील भूमीहीन आदिवासी समाज्याच्या लोकांच्या घराखालील जमिन व घराशेजारील वहीवाटीची जमिन नावे करून त्वरित सात बारा वाटप करणे, वसई तालुक्यातील भूमीहीन आदिवासी समाज्याच्या लोकांना भूमीहीन दाखले वाटप करणे, आदिवासी समाज्याच्या बांधवाना, दुय्यम रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड, नविन रेशन कार्ड, देताना जुन्या रेशन कार्ड पध्दतीची पुस्तिका ऑनलाईन करून त्वरित देण्यात यावी, अर्नाळा येथीत भूमाफियांना पाठीशी घालणारे मंडळ अधिकारी आगाशी मनिलाल साबळे यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांना त्वरित कायम स्वरूपी निलंबित करावे, अर्नाळा शांतीनगर येथिल भूमाफिया पोगेरी कुटुंबावर त्वरित फौजदारी गुन्हा नोदवून कार्यवाही करणे तसेच सदर पोगेरी कुटुंबाने शासकीय गुरचरण जागेवर बांधलेले अनधिकृत व्यापारी गाळे व भाडयाने दिलेले रूम चाळीवर त्वरित तोडक कारवाई करून आदिवासी व इतर लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता मोकळा करावा, आदिवासी समाज्याच्या लोकांनी उदर निर्वाहासाठी केलेले भातशेतीचे अतिक्रमण त्वरित नियमाकुल करावे., आदिवासी समाजाची कामे वेळेवर न करता ती जाणीवपूर्वक महीनों महीने रखडवली जातात.,आदिवासी समाज्याच्या लोकांना मुलभूत हक्का पासुन वंचित ठेवणाऱ्या तलाठ्यावर त्वरित कारवाई करावी, वसई तालुक्यातील सरकारी जागेवरील पारंपारीक आदिवासीं पाड्यांची जागा कोणत्याही सरकारी किवा निमसरकारी संस्थेला वर्ग करू नये. भारतीय राज्य घटनेच्या आदिवासी पेसा कायद्या अंतर्गत कायम स्वरूपी सरकारी १७ पदांची नोकर भरती त्वरित करण्यासाठी शासनाकडे वसई तालुक्यातून प्रस्ताव सादर करावा. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत वन जमिनी व वनपट्टे मंजूर करणे जमिनीच्या पीक पाळण्याची नोंद करणे रेशन व्यवस्थेचे सर्वत्रीकरण महावितरण कडून होणारी फसवणूक बंद करणे वसई तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांसाठी नुकसान भरपाई चा मोबदला देणे, पेसा कायदा अंतर्गत रिक्त जागा भरणे इत्यादी विविध मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडे मांडण्यात आल्या. सोमवारी सदरच्या विविध आदिवासी संघटनांमार्फत विविध शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे शासकीय कामकाज जवळपास ठप्प झाले होते.
आदिवासींच्या विविध संघटनांचे धरणे आंदोलन
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
आय प्रभागासाठी तिसावे सहायक आयुक्त नियुक्त
विरार : वसई विरार शहर मनपाच्या आय प्रभाग समिती साठी अलका खैरे यांची ...
वसई: नागरिकांच्या विरोधानंतर पालिकेची तात्पुरती माघार; करवाढीवर फेरविचार
वसई, २०२५ – २६ च्या अर्थसंकल्पात वसई वि...
वसई पोलिसांचा चिमुकल्यांसाठी मोठा दिलासा: चोरीला गेलेल्या १३ सायकली २ दिवसात सापडल्या
वसई: तीन शाळकरी मुलांचा मोठा दुःखाचा क्षण त्यावेळी सुखद वळणावर आला, जे...
वाचकाने लेखकाच्या संवेदनशीलतेशी नातं जोडावं - वीणा गवाणकर
विरार - वाचनसंस्कृतीचा लोप होत असल्याची ओरड असलेल्या आजच्या काळात अधिक...
Previous
Article