कोल्हापूर:वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत देशात पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्र ) उभारण्याचा मान मिळाला असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 100 बेडचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शासनाकडून 287 कोटी रूपये आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय साठी, 100 बेडचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी 100 कोटी, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय साठी 248 कोटी रुपये मंजूर झाले होते. या तीनही कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्याहस्ते सांगाव, कागल येथे संपन्न झाले. यावेळी आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.रमन घुंगराळेकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी न.रा.पाटील, अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसिलदार अमरदीप वाकडे, अधिष्ठाता भाग्यश्री खोत, सरपंच राजकुमार पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंटर ऑफ एक्सलन्स ही एक अशी संस्था आहे जी विशिष्ट क्षेत्रासाठी नेतृत्व, सर्वोत्तम पद्धती, संशोधन, समर्थन, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देत असते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अखत्यारितील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संसोधन संस्था ही मुख्य उत्कृष्टता केंद्र असेल. यासाठी 70 कोटी 75 लाख रुपये इतक्या खर्चास नुकतीच मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या केंद्रांच्या कार्यान्वयानासाठी कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 अंतर्गत कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कागलच्या मौजे सांगाव येथील माळावर तीन विभागातील वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ होत आहे. याठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय, रूग्णालय व आरोग्य प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यामुळे कोणालाही जिल्हा रूग्णालयात जायाची गरज पडणार नाही. सर्व प्रक्रिया पुर्ण झाली असून येत्या दोन वर्षात सर्व इतारती कार्यन्वित होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यात सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या वैद्यकीय सुविधांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मला मिळालेल्या कार्यकाळात 12 नवीन एमबीबीएस विद्यालये सुरू केली जी राज्याच्या निर्मिती पासून फक्त 23 होती. प्रवेश क्षमता आत्तापर्यंत 75 वर्षात 3850 होती ती 1000 ने वाढवून 4850 केली. रूग्णालयातील खाटांची संख्याही 4300 ने वाढविली. तसेच देशात शासकीय योग व निसर्गोपचार विद्यालयही नव्हते ते आपण कोल्हापूरमध्ये सुरू केल्याचे सांगितले.
उद्घाटक कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाला खऱ्या अर्थाने हसन मुश्रीफ यांनी गती दिल्याचे सांगितले. त्यांनी राज्यातील विविध वैद्यकीय सुविधा सुरू करण्यासाठी धावपळ करून सर्व प्रक्रिया पुर्ण करण्याचे योगदान दिले, असे सांगितले. तसेच बोलताना त्यांनी आयुर्वेद हे मानवाच्या स्वास्थाकडे लक्ष देणारं शास्त्र असल्याचे सांगितले. संचालक रमन घुंगराळेकर यांनी एकाच ठिकाणी आयुर्वेद, ॲलोपॅथी व होमोओपॅथी अशा सेवा मिळणार असल्याचे सांगून याठिकाणी येथील पैलवानांना आहार आणि उपचार याबाबत मार्गदर्शन करणारी एक शाखाही सुरू करणार असल्याचे सांगितले.
देशातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचा मान मला मिळाला - हसन मुश्रीफ
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
माण हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा - अजित पवार
मुंबई:पुण्यातील माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिव...
राज ठाकरे आघाडीत आले तर 'इंडिया' आघाडी त्यांचे स्वागत करेल: राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचे विधान
पुणे :...
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश)
सातारा : सातारा शहरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीने गोंदवले येथे युवका...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव
मुंबई - आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांना...
Previous
Article