कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार देणार, ४५००० पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना १५००० रुपये वेतन, वीज बिलात ३० टक्के कपात आणि १०० दिवसांत व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार अशी गेमचेंजर वचने मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महायुतीकडून कोल्हापूरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी अशा योजना राबवल्या. डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही दिल्लीत जातो ते राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी पैसे मागतो पण काहीजण दिल्लीत जातात मुख्यमंत्री करा, चेहरा बनवा यासाठी जातात मात्र महाविकास आघाडीला जो चेहरा नकोय ते महाराष्ट्राला कसा चालेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.
देंवेंद्रजींनी सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना बंद केली त्याची चौकशी लावली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यासाठी हिंमत लागते आणि काम कराव लागते, असे ते म्हणाले. अडीच वर्षात मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या, महायुतीने दोन वर्षात सिंचनाच्या १२४ सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्षात ३५० कोटी वाटले आणि एक लाख नागरिकांचे प्राण वाचले, असे ते म्हणाले.
आधीच्या सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना मंदिर बंद होती, मंदिरे सुरु करण्यासाठी आंदोलनं करावी लागली, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. विकासाचे मारेकरी म्हणून महा आघाडीची इतिहासात नोंद होईल, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी योजना करण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्या ऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
महायुतीची १० वचने
१) लाडक्या बहिणींना रु.२१००
प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५०००
प्रत्येक वर्षाला रु.१२,००० वरुन रु.१५,००० देण्याचे तसेच MSP वर २०% अनुदान देण्याचे वचन!
३) प्रत्येकास अन्न आणि निवारा
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
४) वृद्ध पेन्शन धारकांना रु.२१००
महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे वचन!
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!
६) २५ लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,०००
प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देण्याचे वचन!
७) ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार
राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५००० आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.१५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
९) वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!
१०) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९ ‘
१०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!
महायुतीने जाहीर केली १० वचने
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
अचलपूरमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
अमरावती:अचलपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण
महाराष्ट्रः नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला त...
गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड: गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आ...
Previous
Article