वसईतील रेशन दुकानांवर धान्याचा काळाबाजार उघडकीस; कडक कारवाई

वसई: वसईतील शिधावाटप केंद्रांवर धान्याचा काळाबाजार केल्याच्या आरोपावरून ५ शिधावाटप दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या दुकानदारांकडून रेशनच्या धान्याची काळाबाजार केली जात होती, आणि ते धान्य खासगी बाजारात विकले जात होते.
ही घटना उघडकीस आल्यानंतर, माणिकपूर पोलीस ठाण्यात रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय खाद्य निगम कडून येणारे धान्य शिधावाटप केंद्रांमध्ये न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जात होते. या प्रकरणी शिधावाटप दुकानदारांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.
जगदंबा महिला बचत गट, श्रमिक महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट यांसारख्या गटांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली. चौकशीत धान्याचा काळाबाजार झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यामुळे संबंधित दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
वसईच्या पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी सांगितले की, या दुकानदारांचे शिधावाटप केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत आणि या दुकांनाची चौकशी केली गेली आहे. यातील काही महिला बचत गटांच्या प्रमुख, अश्विनी गुरव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत.
अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य वितरणासाठी वसईत १८० शिधावाटप केंद्र आहेत. भारतीय खाद्य निगम बोरीवली येथून धान्य या केंद्रांमध्ये पाठवते, पण काही तक्रारी आल्या होत्या की, या ट्रकवरून धान्य अन्य ठिकाणी उतरवले जात होते.
वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तक्रार पुरवठा विभागाकडे केली होती आणि रंगेहाथ या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
What's Your Reaction?






