वसईत करोनाचा शिरकाव; महापालिकेकडून चाचण्यांना गती, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

वसई – मुंबई आणि ठाण्यानंतर आता वसई शहरातही करोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात करोनाचे रुग्ण आढळून येत असून, ठाण्यात करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांची तपासणी, आवश्यक ठिकाणी चाचण्या वाढवणे, तसेच विलगीकरणाची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेचे अधिकारी सांगतात की, "सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी वाढवण्यात येत आहे. कोणतीही गाफीलपणा न करता आवश्यक ती आरोग्य सेवा त्वरित उपलब्ध करून दिली जात आहे."
विशेष उपाययोजना
-
वसईतील विविध रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड चाचणी सुविधा उपलब्ध
-
संशयित रुग्णांचे संपर्क शोधणे व विलगीकरणात ठेवणे
-
गर्दीच्या ठिकाणी सैनिटायझेशन व स्वच्छता मोहिम राबवणे
-
नागरिकांना मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पालन करण्याचे आवाहन
महापालिकेने नागरिकांना खालील गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
-
लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा
-
अनावश्यक गर्दी टाळावी
-
कोविड लसीकरण पूर्ण केले नसेल तर तातडीने लस घेणे
"करोना अद्याप पूर्णतः संपलेला नाही. नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. प्रशासन आपले काम करत आहे, पण जनतेच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही," असे मत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?






