नवी दिल्ली:अबू धाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी आज (9 सप्टेंबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या की, यूएईबरोबर भारताच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीशी सुसंगत असलेली उच्च-स्तरीय प्रतिबद्धतेची दीर्घ परंपरा जारी राखत संयुक्त अरब अमिरातचे नेतृत्व करणाऱ्या तिसऱ्या पिढीचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे. राष्ट्रपती पुढे म्हणाल्या,दोन्ही देशांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे गेल्या दशकभरात ऐतिहासिक द्विपक्षीय आणि दूरदर्शी संबंधांमध्ये परिवर्तन झाले आहे.अबू धाबीच्या युवराजांच्या भेटीदरम्यान, नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या अनेक करारांद्वारे आपण ही भागीदारी आणखी वाढवली, याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, यूएईमध्ये 35 लाखांहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्य करतात त्यामुळे उभय देशांमध्ये लोकांचे एकमेकांमध्ये असलेले संबंध या नात्याचा पाया आहेत. विशेषत: कोविडसारख्या महामारीच्या कठीण काळात तिथे वास्तव्य करणाऱ्या भारतीय लोकांची घेतलेली विशेष काळजी, त्यांचे कल्याण सुनिश्चित केल्याबद्दल राष्ट्रपतींनी यूएईच्या नेतृत्वाचे कौतुक केले. भारत आणि यूएईमध्ये एकसंध आणि बहुसांस्कृतिक वारसा असलेला समाज आहे. महात्मा गांधी आणि सन्माननीय महोदय शेख झायेद यांनी दाखवलेला शांतता, सहिष्णुता आणि सौहार्दाचा मार्ग आपल्या राष्ट्रीय चरित्रात खोलवर रुजलेला आहे, याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अमिराती समाजाच्या सर्व स्तरांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग आणि योगदान याविषयी राष्ट्रपतींना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, भारत आणि यूएई या दोन्ही देशांनी दाखवून दिले आहे की, "महिलांच्या नेतृत्वाखाली होणारा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरू शकतो.’’
अबू धाबीच्या युवराजांनी घेतली राष्ट्रपती मुर्मूंची भेट
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
शाश्वत, सुरक्षित, पौष्टिक जग निर्माण करण्याचे स्वप्न साकार करूया - पंतप्रधान
नवी दिल्ली: एक शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि पौष्टिक जग निर्माण कर...
मेळघाटात भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी
अमरावती : मेळघाटमधील वळण रस्त्यावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.अमरा...
भारताचे प्रधानमंत्री मोदी आणि फलस्तीनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास न्यूयॉर्कमध्ये भेटले
न्यूयॉर्क:भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिका दौऱ्यात फलस्...
मोदी सरकारच्या काळात पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी - रघुराम राजन
नवी दिल्ली:गेल्या 10 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात ...
Previous
Article