वसई: नागरिकांच्या विरोधानंतर पालिकेची तात्पुरती माघार; करवाढीवर फेरविचार

वसई: नागरिकांच्या विरोधानंतर पालिकेची तात्पुरती माघार; करवाढीवर फेरविचार

वसई, २०२५ – २६ च्या अर्थसंकल्पात वसई विरार शहर महापालिकेने पाणीपट्टी करात २५ टक्के आणि मालमत्ता करात ५ ते ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, आणि विविध राजकीय पक्षांच्या विरोधानंतर, पालिकेने तात्पुरती स्थगिती जाहीर केली आहे.

महापालिकेने नुकतेच २०२४-२५ चा सुधारीत अर्थसंकल्प ३५३८.९४ कोटी आणि २०२५-२६ चा मूळ अंदाज ३,९२६ कोटी ४४ लाख रुपये सादर केला होता. या अर्थसंकल्पानुसार, पाणीपुरवठा लाभ कर आणि मलप्रवाह सुविधा लाभ कर अशा करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करवाढीच्या निर्णयामुळे १ एप्रिलपासून लागू होणारी वाढ, नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे स्थगित करण्यात आली आहे.

शहरातील नागरिक, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी जोरदार विरोध दर्शवला आणि पालिकेला करवाढ रद्द करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे, काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने सर्वपक्षीय समिती नियुक्त करून, करवाढीवर फेरविचार करण्याचे जाहीर केले आहे.

पालिकेने यासंदर्भात स्पष्ट केले की, आगामी निर्णय एकत्रित चर्चा आणि जनहिताच्या दृष्टीकोनातून घेतला जाईल. यामुळे पालिकेने असलेल्या कर वाढीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow