वसई: मयंक ज्वेलर्सवरील दरोड्याची उकल पोलिसांनी केली असली तरी सराफ मालकाने पोलिसांच्या तपासावरच संशय व्यक्त केला आहे. साडेनऊशे ग्रॅम सोन्याची चोरी झाली असताना पोलिसांनी फक्त ३०० ग्रॅम सोने परत मिळवले मग उर्वरित ६०० ग्रॅम कुठे गेले? असा सवाल सराफ मालकाने केला आहे. चोरांनी सोने वितळवले मात्र त्यात २० टक्के घट होत नसल्याचे सांगून त्यावरही संशय व्यक्त केला आहे. माणिकपूर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
१० जानेवारी २०२५ रोजी वसईच्या मंयक ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला होता. चोरांनी दुकानाचे मालक महेंद्रसिंह संघवी यांना मारहाण करून दुकानातील सोने लुटून नेले होते. या दरोड्यात एकूण ९५० ग्रॅम सोने लुटण्यात आले होते अशी तक्रार फिर्यीद संघवी यांनी दिली होती. माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने याप्रकरणी तपास करून ५ जणांच्या टोळीला अटक केली होती. या आरोपींनी ४७ तोळे सोने चोरल्याची कबुली दिली होती. ते सोने वितळवून कर्नाटक येथील ३ सोनारांना विकले होते. पोलिसांनी ते सोने हस्तगत केले आहे. मात्र ९५० ग्रॅम म्हणजे ९५ तोळे सोने चोरीला गेले असताना केवळ २९३ ग्रॅम सोने परत मिळवले आहे तर मग उर्वरित ६०० ग्रॅम सोने कुठे गेले असा सवाल मालक संघवी यांनी केला आहे. ४७ तोेळे सोने वितळवून २९ तोळे झाले असे पोलिसांनी सांगितले. त्याला देखील हरकत घेण्यात आली आहे. सोने वितळविल्यावर घट २ ते ५ टक्के होते. २० टक्के घट होतच नाही असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी आठवड्याभरात जर आमचे सोने परत मिळवले नाही तर वसईतील सराफांच्या संघटनेमार्फत आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
माणिकपूर पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. तक्रारदारांनी अतिरिक्त जबाब देण्यासाठी ५ दिवस लावले. त्यानंतर ९५० ग्रॅम सोने गेल्याचा दावा केला. मात्र ते त्याचा हिशोब देऊ शकले नाहीत. तक्रारदारांच्या जबाबातच विसंगती आहे. आम्ही आरोपींची कसून चौकशी केली आणि ४७ तोळे हस्तगत केले आहे. आमच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बारकावे, तपशील सखोल तपासले आहे, त्यामुळे तक्रारदारांच्या दाव्यात काही अर्थ नाही असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले. जर पोलिसांवर विश्वास नसेल तर सीआयडी कडे किंवा न्यायालायात दाद मागावी असेही ते म्हणाले. तक्रारदाराने साडेतीन कोटींचा विमा काढला होता. मात्र चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाल्याने या विम्याची रक्कम मिळणार नाही, म्हणून हा कांगावा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
वसई : हरवलेल्या सोन्याबाबत ज्वेलर्सचे पोलिस तपासावर प्रश्न, 600 ग्रॅम चोरीला गेलेल्या सोन्याबाबत स्पष्टीकरणाची मागणी
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टीचे चिन्ह मिळाले उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले
बहुजन विकास आघाडीला सोमवारी सकाळी शिट्टी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्याया...
वसई-विरार महापालिकेच्या आरो विभागाला बनावट औषधांचा पुरवठा; वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वसई, १ जुलै:
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वसई-विरार महानगरपालिका सज्ज! यंदाही कृत्रिम तलावांची बांधणी करणा
विरार:वसई-विरार शहर महानगरपालिकेने यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा...
वसईच्या गोगटे सॉल्टच्या भूखंडावर 'धारावी' होण्यास आ. क्षितिज ठाकूर यांचा विरोध; वांद्रे-कुर्ला सारखी व्यावसायिक संकुले होण्याची मागणी
वसई : आशियातील दुसऱ्या क्रमांकाची झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावी...
Previous
Article