विरार हादरले! दोन सख्ख्या भावांनी तलावात उडी घेतली; एका भावाचा मृत्यू, परिसरात हळहळ

विरार हादरले! दोन सख्ख्या भावांनी तलावात उडी घेतली; एका भावाचा मृत्यू, परिसरात हळहळ

विरार : विरार पूर्वेतील टोटाले तलावात दोन सख्ख्या भावांनी अचानक उडी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हृदयद्रावक घटना आज दुपारी सुमारे २ वाजता घडली. या घटनेत एका भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सबोध कुमार (वय २७), जो बिहारला जाण्याच्या तयारीत होता, त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट स्कायवॉकवरून धावत जाऊन टोटाले तलावात उडी घेतली. त्याचा भाऊ देखील त्याच्या मागोमाग पाण्यात शिरला. हे पाहून स्थानिकांमध्ये गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. काही तरुणांनी धाडसाने पाण्यात उड्या मारून दोघांनाही बाहेर काढले.

यातील एका भावाला वाचवण्यात यश आले असून दुसरा भाऊ – सबोध कुमार – पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दोघे भाऊ विरारमधील एका हॉटेलमध्ये काम करत होते. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणाव हे कारण असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. बचाव करण्यात आलेल्या भावाला प्राथमिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मानसिक तणावातून अशा प्रकारच्या टोकाच्या पावलांकडे समाजाने आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow