पालघर: पालघर जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला असून, जिल्ह्यात २६ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy to Very Heavy Rainfall) होण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा तसेच सर्व आश्रमशाळा व महाविद्यालये २६ सप्टेंबर रोजी बंद राहतील. तथापि, मुख्याध्यापक, शिक्षक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हवामान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, भविष्यातील परिस्थितीनुसार अधिक निर्णय घेतले जातील.
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; २६ सप्टेंबर रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
संभाव्य एचएमपीव्ही संसर्ग रोखण्यासाठी वसई विरार महापालिका सज्ज
चीन मधून आलेला नवीन विषाणू मानवी मेट्यानूमोव्हायरस एचएमपीव्ही च्या संसर्गाला रोखण्यास...
वसई-विरार : नालासोपाऱ्यात वैद्यकीय दुकानाचे आमिष दाखवून तरुणाची ३५ लाखांची फसवणूक
पालघर ७ ऑगस्ट २०२५
परिवहन विभागाची कडक कारवाई; २४० रिक्षांवर छापेमारी, ४५ जप्त
वसई, २२ मार्च २०२५ – वसई विरार...
Previous
Article