एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारले; मुख्यमंत्रिपदावर ठाम

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारले; मुख्यमंत्रिपदावर ठाम

मुंबई - महाराष्ट्र राज्यातील निवडणुकांनंतर महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले, यांनतर आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेस सुरु आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी जोर धरत आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 230 पैकी 132 जागा जिंकून आपल्या इतिहासातील सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भाजपाकडून फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे. तर शिवसेना शिंदे गट मात्र एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रही आहेत. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत. शिरसाट यांनी असेही म्हटले की, शिंदे हे महायुतीचा प्रमुख चेहरा होते, ज्यांनी 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. "निवडणूक शिंदे यांच्या नावावर लढवली गेली आणि त्यांनाच  मुख्यमंत्रिपदाचा अधिकार आहे," असे शिरसाट म्हणाले.

महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे, त्यांनी 288 विधानसभा जागांपैकी 230 जागांवर विजय मिळवला. तरीसुद्धा, भाजपा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत आहे, तर शिंदे गट आपले मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी आग्रही आहे.

या सत्तासंघर्षाच्या दरम्यान, काही सूत्रांचे म्हणणे आहे की, शिंदे यांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे वचन देण्यात आले होते. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारून फडणवीस यांच्या बाजूने उभ्या असलेल्या भाजपा विरोधात स्पष्ट संकेत दिले आहेत. या राजकीय नाट्याचा पुढील अध्याय उलगडत असताना, दोन्ही पक्षांमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होण्यासाठी महाराष्ट्राला अजून वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow