मुंबई : राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रक्रियेस आता गती मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय देताना नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.
प्रभाग रचनेवर हरकत घेणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. याबाबत न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, "प्रभाग किंवा वॉर्ड रचना करण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य सरकारचाच आहे." त्यामुळे राज्य सरकारने ज्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचना केली आहे, त्याच्याच आधारे राज्यातील निवडणुका होतील.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे 2021 पासून रखडल्या होत्या. त्यामागील मुख्य कारण म्हणजे ओबीसी आरक्षणावर सुरू असलेला कायदेशीर वाद. सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर नवीन प्रभाग रचनेचे आदेश जारी करण्यात आले होते.
लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेसंबंधी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेत नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली, आणि राज्य सरकारच्या नवीन रचनेला मान्यता दिली.
2022 मध्ये तयार केलेल्या प्रभागरचनेचा कायदा न्यायालयाने यापूर्वीच रद्द केला आहे. त्यामुळे 2017 मध्ये करण्यात आलेल्या प्रभागरचनेनुसारच निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच 1994 ते 2022 दरम्यानच्या ओबीसी आरक्षण स्थितीप्रमाणेच आरक्षण दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आणि चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मार्ग मोकळा झाला आहे.
मोठा निर्णय! महापालिका निवडणुका आता नवीन प्रभागरचनेनुसारच – सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणासह निवडणुकीस हिरवा कंदील
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
मुंबई - मतदानाच्या दिवशी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा - जिल्हाधिकारी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांम...
धक्कादायक ! मुंबईत ५६ वर्षीय नराधमकडून १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार
मुंबई - मोबाईलमधील ऑडिओ किल्पवरून ब्लँकमेल करत एका ५६ वर्षीय नराधमाने ...
मीरा भाईंदर: जिल्हास्तरीय खेळाच्या आयोजनात निष्काळजीपणा, मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मीरा भाईंदरमधील जिल्हास्तरीय खेळाच्या आयोजनात मुलांच्या सुरक्षेची मोठी ढिलाई समोर आली आ...
Stay Connected
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबवले
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनां...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने १...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्यक आयुक्त गणेश पाटील निलंबित
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठ...
Previous
Article