जम्मू:जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने राज्यात अनुच्छेद 370 परत लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याची शक्ती नाही असे शाह यांनी ठणकावले. ते गुरुवारी उधमपूर येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी शाह म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात आम्ही काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा नक्कीच मिळेल, पण तो नरेंद्र मोदी देतील. ओमर अब्दुल्ला आणि राहुल बाबा म्हणतात की, आम्ही काश्मीरमध्ये लोकशाही आणू. पण, जम्मू-काश्मीरला 70 वर्षे याच 2 कुटुंबांनी विभागून ठेवले. यापूर्वी राज्यात शांततेत निवडणुका होत नसत. नरेंद्र मोदींमुळे आज राज्यात शांततेत निवडणुका होत असल्याचे शाह यांनी सांगितले. काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ओमर अब्दुल्ला दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालायचे. अफल गुरुला फाशी देणे गरजेचे होते. जो कोणी दहशत पसरवेल त्याला फाशीनेच उत्तर दिले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद परत आणण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचे शाह यांनी बजावले. जम्मू आणि काश्मीरमधील 40 हजार लोकांच्या हत्येसाठी अब्दुल्ला आणि नेहरू जबाबदार आहे. ते उन्हाळ्यात लंडनमध्ये सुट्टी घालवत होते, महागड्या मोटारी चालवत होते. कोणत्याही पक्षाने नाही तर केवळ भाजपनेच जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट केला आहे. आत्ताच राहुल बाबा इथे आले होते, ते म्हणाले की इथे बाहेरचे लोक राज्य करतात. त्यांचा निशाणा उप-राज्यपालांवर होता. पण, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक राष्ट्रपती राजवट त्यांची आजी इंदिरा आणि वडील राजीव गांधी यांच्या काळात लावण्यात आली होती अशी टीका शाह यांनी केली. यापूर्वी कधीच लाल चौकात ताजिया मिरवणूक, गणपती मिरवणूक आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली नाही. आज लाल चौकातही गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. हा दृष्टिकोनाचा फरक आहे. घाटीत 33 वर्षांनंतर चित्रपटगृहे सुरू झाली. फारुख साहेब, तुमच्यामुळे 33 वर्षे सिनेमा हॉल बंद होते. जग जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एकीकडे एनसी, काँग्रेस आणि पीडीपी हे पक्ष जवळपास 40 वर्षांपासून या प्रदेशात दहशतवाद कायम ठेवत आहेत. दुसरीकडे, दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे शाह यांनी सांगितले. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वार्षिक हप्ता 6 हजारांवरून 10 हजारांपर्यंत वाढवणार आहोत. याशिवाय, जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार, मेट्रो आणणार आहोत. दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या 100 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन देखील गृहमंत्र्यांनी दिले.
तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 परत आणण्याची शक्ती नाही”- अमित शाह
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : घड्याळ चिन्ह कोणाच्या राष्ट्रवादी पक्षाला
नवी दिल्ली : येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वा...
पश्चिम बंगाल : आंदोलनरत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज ,महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण
पश्चिम बंगाल:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राजीनाम्या...
भारत आणि मलेशियामध्ये 'संपूर्ण धोरणात्मक भागीदारी' स्थापन करण्याचा निर्णय
दिल्ली, : भारत आणि मलेशियाने मंगळवारी त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना संपूर्ण धोरणात्मक भागीदारी Co...
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश - मुख्यमंत्री
नवी दिल्ली : राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड दे...
Previous
Article